Wednesday, May 9, 2007

तनहाई..

दोन पाखरं काही वेळ एका फांदीवर बसून चिवचिवली म्हणून काही त्यांची घरटी एक होत नसतात.

केंव्हातरी आपणासोबतचं पाखरू फांदीवरून उडून जातं.
आपल्याला वाटत असतं ते आपल्यासोबतच आहे, कारण
आपली नजर समोरच्या विस्तृत आकाशाकडे असते.

पण तेंव्हाच त्या आकाशात उडताना आपणास पाहणारं
त्या फांदीवरती कोणी नाही हे समजल्यानंतर,

ते आकाशही त्या फांदीपुढे नगण्य वाटू लागतं..
आणि इच्छा होते परतण्याची...


मनात ओळी येतात..


रात्र नाही तुही नाही चंद्र नाही सोबती
तु दिलेल्या मोगर्‍याचा गंध नाही सोबती
सांग या तारांगणातून मी मला रमवू कसा
तारका न्याहाळण्याचा छंद नाही सोबती..

वरील चारोळी ही लोकमत ' मैत्र ' (वॅलेंटाइन विशेषांक २००७) यातून वाचलेली..लेखक अज्ञात

1 comments:

ANANT said...

wed wachan............
Tu nustach changla lekhak nahis tar ek changla wachakhi ahes re mitra...........

Great Collection..............